Sunday, 29 March 2020

सुखाची व्याख्या

आपल्याला सगळ्यांनाच रोज चालू असलेल्या आपल्या नियमित जीवनाचा कंटाळा कधीतरी येतोच ना? मग मनात कसबस होत अस्वस्थ वाटायला लागतं. मग अश्या वेळी जरा माझं एका आणि मी सांगतो तस जगून पहा ना...

पळापळीतुन निवांत आपला एक दिवस काढायचा, फोन ला सुट्टी द्यायची, कॅमेरा घ्यायचा सोबत.. कोणी असू नसू आपण आपलं निघायचं. निसर्गात हरवून जायचं. ते सौंदर्य अनुभवायचं. डोळ्यात, कॅमेऱ्यात साठवायच.हेडफोन्स न लावता वाऱ्याच्या संगतीने पक्षी गात असलेलं  संगीत ऐकायचं. तहान लागली की झऱ्याच/टाक्यातल मस्त गार पाणी पोटभर प्यायचं. दम लागला की झाडाच्या सावलीत अंग टाकून द्यायचं. 

सगळं फिरून झालं की पोटात भुकेने व्याकुळ झालेलं कावळे केव्हाच ओरडायला लागलेले असतात, मग नकळत पाऊले निघतात ती आज्जीच्या झोपडी कडे, जसे जसे जवळ पोहचू तसा तसा त्या चुलीवर शिजणार्या गडकिल्यांच्या खोऱ्यात पिकलेल्या तांदळाच्या भाताचा चुलीवर शिजत असतानाचा सुवास येऊ लागतो. आणि हा असा भात मला नाही वाटत जगात कुठे मिळत असावा.. नंतर तिथे पोहचताच मस्त लिंबू सरबत प्यायचं, आणि फ्रेश व्हायचं. तोवर आज्जीच्या घरच्यांनी गरम गरम भाकरी भाजीच ताट वाढलेलं असत, असेल त्या बेतावर यथेच्छ ताव मारायचा... 

इथे आपली मज्जा असते, ही लोक जेवण हे सेवा म्हणून देतात. तिथे फक्त नफा कमावणे हा उद्देश कधीच नसतो.तुम्हाला हवं तसं ताटात आनंदाने वाढलं जात, ते खायचं कारण त्या चुलीवरच्या जेवणाची सर कुठल्याच जेवणाला कधीच येऊ शकत नाही. हे सगळ होईपर्यंत सूर्य ढळायला आलेला असतो, वेळ होते, आणि मग तिन्हीसांजेच्या वेळेला परतीच्या प्रवासाच्या दिशेने पाऊल वाट चालायला लागतात....या सगळ्यात मिळालेली मानसिक ऊर्जा पुढच्या प्रवासापर्यंत जगण्यासाठी पुरेशी असते...

आणि हो तुम्हाला माहितीये, या आज्जीच्या झोपडीत भलेही लाईट नसेल,पण इथून तृप्त झालेल्या जीवांच्या चेहऱ्यावरच्या समाधानाने ही झोपडी किती उजळून निघत असेल हे वेगळं सांगायला नको....

भटक्याच्या डायरीतुन 
20/01/2020

Wednesday, 25 March 2020

लिफ्ट

रस्त्याला उभे राहून हात करून वाहन थांबवायच आणि थोड्या अंतरासाठी त्यांची मदत घ्यायची हा सुद्धा एक प्रवासाचाच भाग ना तर त्यावरचा हा एक अनुभव...


आजचा दिवस तसा मस्त गेला. 

सकाळी रूममेट चा कॉल आला, अरे $*@*#(#% इंटर्नशिप चा क्लीअरन्स चा आज शेवटचा दिवस आहे. कधी येतोय ? येतो म्हणलं,आवरलं आणि निघालो.बाईक वर जायचं होतं पण तिकडे बेक्कार पाऊस आहे आणि अस्मादिकांच्या डांगीत खूप किडे आहेत सो घरचे लै विचारतात करतात गाडी द्यायला 😅 असो.




स्टँड ला आलो तर कळलं माळशेज च्या घाटात दरड कोसळली आहे सो तिकडच्या बस बंद आहेत. मग काय मस्ती मोड ऑन झाला इथे आपला. मग आपण एका कार ला लिफ्ट मागितली, त्याने दिली पुण्याचा होता.नितीन नाव होतं म्हणे,मालकाला इथे सोडलंय,घरी मॅम ला गाडी लागते म्हणून सरांनी परत पाठवलंय.माझे तेवढेच खर्चाचे पैसे सुटतात म्हणून नीट वाटणारे लोक घेत असतो. इथून पुढे मग आर्थिक मुद्द्यांवर चर्चा झाली, १५ हजारांपर्यंत पगार मिळतो म्हणे सगळं मिळून.त्याने मला ३५-४० मैल सोडलं. हो नाय हो नाय करत नॉमिनल पैसे दिले त्यांना आणि थँक्स बोलून निरोप घेतला.

मग आपण ट्रक ला लिफ्ट मागितली,२० मैल ट्रक मद्धे गेलो.आप्पा नाव होतं ड्रायवर च, ड्रायव्हर बीड चा होता, चाकण ला जात होता Midc मधून ऍग्रीकल्चर शॉप च सामान घेऊन जायचं होतं म्हणे त्याला. इथे सुद्धा मग पगारपाण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत सगळ्या गप्पा झाल्या. भाऊ म्हणे ९० लावल्याशिवाय आपण गाडी ला हात लावत नाही,आणि लावला तर गाडी नीट चालत नाय. (बेंचो अवघड असतात ना ड्रायव्हर लोक पण) तो टाकळी मद्धे थांबला मग त्याला पैसे दिले आणि टाटा केला.

नंतर लालपरी ने टाकळी ते आळेफाटा गेलो ते कॉमन होत . 😂

नंतर परत कार ला लिफ्ट मागितली,तो व्यक्ती डॉक्टर होता. खेडेगावात खूप सहज लोक लिफ्ट देतात ( अर्थात थोबाड पाहूनच 😂) ते क्लीनिक ला जात होते. सिजन आहे वगैरे गप्पा झाल्या मला फुकटचे सल्ले तत्वज्ञान वगैरे देण्यात आल,आणि नशिबाने हे अंतर कमी होत तर यांनी मला रूम जवळ सोडलं. आणि ते पुढे गेले. पैसे नाय घेतले देत असून पण, म्हणे पाऊस आहे म्हणून मदत केली थँक्स बोललो. चहा ऑफर केला पण त्यांना घाई होती सो ते गेले.

परत घरी येताना सुद्धा सेम प्रकार केला रिस्क आहे यात मान्य आहे, पण मज्जा आहे फायदे आहेत.

काही फायद्याच्या गोष्टी :-

◆ पैसे कमी लागतात.
◆ खूप अफाट माहिती मिळते.
◆ वेळ कमी लागतो.
◆ मनोरंजन होते.
◆ ओळखी होतात.
◆ आणि माणसं वाचायला मिळतात

मागच्या काही दिवसांपासून (महिन्यांपासून) हा प्रकार आवडायला लागला आहे. खूप लोकांची जीवनपद्धती कळते,आर्थिक गोष्टी असतात ज्या शक्यतो कोण सांगत नाय. पण अश्या प्रवासांत याच गोष्टींवर जास्त चर्चा होते,अनुभव येतात. 

तर आजचा दिवस संपतोय दिवसभर ९ वाहनांतून सुमारे २१० किलोमीटर चा प्रवास केलाय ३०० रुपये खर्च झालेत आणि १५ नवीन लोक भेटलेत.

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.

डायरीतल्या गोष्टी.

-श्रीपाद कुलकर्णी