रस्त्याला उभे राहून हात करून वाहन थांबवायच आणि थोड्या अंतरासाठी त्यांची मदत घ्यायची हा सुद्धा एक प्रवासाचाच भाग ना तर त्यावरचा हा एक अनुभव...
आजचा दिवस तसा मस्त गेला.
सकाळी रूममेट चा कॉल आला, अरे $*@*#(#% इंटर्नशिप चा क्लीअरन्स चा आज शेवटचा दिवस आहे. कधी येतोय ? येतो म्हणलं,आवरलं आणि निघालो.बाईक वर जायचं होतं पण तिकडे बेक्कार पाऊस आहे आणि अस्मादिकांच्या डांगीत खूप किडे आहेत सो घरचे लै विचारतात करतात गाडी द्यायला 😅 असो.
स्टँड ला आलो तर कळलं माळशेज च्या घाटात दरड कोसळली आहे सो तिकडच्या बस बंद आहेत. मग काय मस्ती मोड ऑन झाला इथे आपला. मग आपण एका कार ला लिफ्ट मागितली, त्याने दिली पुण्याचा होता.नितीन नाव होतं म्हणे,मालकाला इथे सोडलंय,घरी मॅम ला गाडी लागते म्हणून सरांनी परत पाठवलंय.माझे तेवढेच खर्चाचे पैसे सुटतात म्हणून नीट वाटणारे लोक घेत असतो. इथून पुढे मग आर्थिक मुद्द्यांवर चर्चा झाली, १५ हजारांपर्यंत पगार मिळतो म्हणे सगळं मिळून.त्याने मला ३५-४० मैल सोडलं. हो नाय हो नाय करत नॉमिनल पैसे दिले त्यांना आणि थँक्स बोलून निरोप घेतला.
मग आपण ट्रक ला लिफ्ट मागितली,२० मैल ट्रक मद्धे गेलो.आप्पा नाव होतं ड्रायवर च, ड्रायव्हर बीड चा होता, चाकण ला जात होता Midc मधून ऍग्रीकल्चर शॉप च सामान घेऊन जायचं होतं म्हणे त्याला. इथे सुद्धा मग पगारपाण्यापासून खाण्यापिण्यापर्यंत सगळ्या गप्पा झाल्या. भाऊ म्हणे ९० लावल्याशिवाय आपण गाडी ला हात लावत नाही,आणि लावला तर गाडी नीट चालत नाय. (बेंचो अवघड असतात ना ड्रायव्हर लोक पण) तो टाकळी मद्धे थांबला मग त्याला पैसे दिले आणि टाटा केला.
नंतर लालपरी ने टाकळी ते आळेफाटा गेलो ते कॉमन होत . 😂
नंतर परत कार ला लिफ्ट मागितली,तो व्यक्ती डॉक्टर होता. खेडेगावात खूप सहज लोक लिफ्ट देतात ( अर्थात थोबाड पाहूनच 😂) ते क्लीनिक ला जात होते. सिजन आहे वगैरे गप्पा झाल्या मला फुकटचे सल्ले तत्वज्ञान वगैरे देण्यात आल,आणि नशिबाने हे अंतर कमी होत तर यांनी मला रूम जवळ सोडलं. आणि ते पुढे गेले. पैसे नाय घेतले देत असून पण, म्हणे पाऊस आहे म्हणून मदत केली थँक्स बोललो. चहा ऑफर केला पण त्यांना घाई होती सो ते गेले.
परत घरी येताना सुद्धा सेम प्रकार केला रिस्क आहे यात मान्य आहे, पण मज्जा आहे फायदे आहेत.
काही फायद्याच्या गोष्टी :-
◆ पैसे कमी लागतात.
◆ खूप अफाट माहिती मिळते.
◆ वेळ कमी लागतो.
◆ मनोरंजन होते.
◆ ओळखी होतात.
◆ आणि माणसं वाचायला मिळतात
मागच्या काही दिवसांपासून (महिन्यांपासून) हा प्रकार आवडायला लागला आहे. खूप लोकांची जीवनपद्धती कळते,आर्थिक गोष्टी असतात ज्या शक्यतो कोण सांगत नाय. पण अश्या प्रवासांत याच गोष्टींवर जास्त चर्चा होते,अनुभव येतात.
तर आजचा दिवस संपतोय दिवसभर ९ वाहनांतून सुमारे २१० किलोमीटर चा प्रवास केलाय ३०० रुपये खर्च झालेत आणि १५ नवीन लोक भेटलेत.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा.
डायरीतल्या गोष्टी.
-श्रीपाद कुलकर्णी

No comments:
Post a Comment