Thursday, 23 April 2020

सुबह ए बनारस

#सुबह_ऐ_बनारस 

तसा माझा दिवसातला सगळ्यात आवडता वेळ हा संध्याकाळचा असायचा आज ही आहे. खूप काही होत अस सगळ्यांना ऊर्जा देणारा सूर्य शांतपणे खाली जात असतो, लोक घरी येत असतात, दमलेले असतात पण घरी येणार म्हणून समाधान वगैरे असत. पक्षांची किलबिल चालू असते आणि घरट्यात जाण्याची तयारी सुद्धा. अस खूप काही होत या वेळेत. प्रत्येकाच्या नजरेवर ते डिपेंड करत, अजून कोणासाठी हे वेगळं असेल,पण या संध्याकाळ आवडण्याला बनारस अपवाद ठरलं. बनारस ला गेलो आणि तिथल्या सकाळ च्या वातावरणावर केव्हा प्रेम जडलं ते कळलंच नाही.

तिथे सूर्योदयाची वेळ म्हणजे पहाटे 5 ते 6.30. (ऋतूनुसार बदलत असते पण या दीड तासात कधीही) सकाळी सगळीकडे प्रसन्न वातावरण असत, आल्हाददायक थंडीची चादर पसरलेली असते या वातावरणात मस्त अंघोळ वगैरे करून बाहेर पडावं, नंतर काशी कॅफे मद्धे कुल्हड़ मधली स्ट्रॉंग कॉफी प्यावी आणि फ्राईड इडली फ्राईड वडा चा ट्रॅडिशनल ब्रेकफास्ट करून घाटाकडे निघावं.

या घाटांवर एवढ्या गोष्टी एकाच वेळी घडत असतात की विश्वास बसणार नाही. हो म्हणजे काही लोक गंगेत अंघोळ करत असतात, गंगेची आरती चालू असते, काही नावाडी आपली नाव तयार (प्रिप्रेशन) करत असतात, मद्धेच एखाद्या बाजूजे बासरीचे स्वर ऐकायला येतात, तर कधी बाजूला मांझी सारखा 'भवरवा एतोहरा संदेस' गाणारा दिसतो. कोणी मॉर्निंग वॉक ला आलेलं असत तर कोणी स्पेशल अस्सी घाटावर चहा पिण्यासाठी आलेला असतो. खूप साऱ्या प्रकारचे खूप लोक इथे असतात. 

माझ्या दिवसाची सुरवात तर इथेच घाटावर व्हायची. सकाळी आवरून घाटावर जायचं, किंचित उजेडायला लागलं की मग बोटीत बसायचं आणि बोट राईड घ्यायची. हो थोडे कुडकुडत जरी असाल तरी त्या थंडीचा आनंद घ्यायचा कारण थोड्या वेळात सूर्योदय होऊन ऊन पडायला लागत आणि उष्णता निर्माण होते.

शांत वाहणारी गंगामाई, त्यावर पसरलेली धुक्याची चादर आणि त्या चादरीत मस्त बागडणारे सायबेरीयण पक्षी. अश्या सगळ्यात आपण बोटीतून हे सगळं पाहात बसायचं. नकळत तिकडे वर तो सूर्याचा तेजस्वी लाल गोळा वर सरकतच असतो त्यात तुमच्यासोबत जर कोणी आर्टिस्ट (वाद्य वाजवणारा/गाणारा) असेल तर सोने पे सुहागा. (येस आपुन के साथ थे, और ओ भी जितने दिन था उतने दिन दिन, त्यावर वेगळं लिहिल मी.) मस्त अंधारात सुरू झालेला प्रवास ७.३० पर्यंत ऊन पडेपर्यंत संपून जातो, गंगेचे पहाटेचे रूप आणि हे आत्ताच रूप पूर्णपणे वेगळं असत. गंगेचे सगळे घाट ही नावाडी लोक तुम्हाला माहिती देत फिरवून आणतात आणि शेवटी जिथे तुम्ही बसलेला असता तिथे सोडतात.

पण काहीही अस ना तरी सुद्धा प्रत्येक ठिकाणच्या चालू असलेल्या वेगवेगळ्या क्रिया या खूप मनात भरून जातात, जस की हरिश्चंद्र माणिकर्णिका वर चालू असणारे अंत्यविधी असतील अस्सी घाटावर वॉक ला येऊन गिटार वाजवत असलेले कपल्स असतील किंवा मग दशाश्वमेध घाटावर स्नान संध्या करून तपश्चर्येला बसलेले साधू असतील किंवा मद्धेच कुठेतरी कोणी मासे पकडण्यासाठी गळ लावून बसलेला लहान सहान मुलगा सुद्धा दिसेल किंवा एखादे म्हातारे आजोबा सुद्धा असतील.

हे सगळं एवढं मस्त वाटत असते की इथून पाय निघत नाही.एकंदरीत काय तर तिथली सकाळ जास्त सुंदर असते, कोणी या सगळ्या वातावरणाच्या प्रेमात नाही पडला तर नवलच..!

-श्रीपाद 
-४/१२/१९

#First_Solo_Tour #Banaras 

No comments:

Post a Comment